Swadhay – Seventh History- Itihasachi sadhane

 स्वाध्यायमाला – प्रश्नोत्तरे  इतिहास नागरिकशास्त्र 1 – इतिहासाची साधने 

प्रश्न . गटांतील वेगळा शब्द शोधून लिहा :

(१) भौतिक साधने, लिखित साधने, अलिखित साधने, मौखिक साधने. —  अलिखित साधने,

2)  स्मारके, नाणी, लेणी, कथा, –   कथा हा वेगळा घटक आहे 

3)  भूर्जपत्रे, मंदिरे, ग्रंथ, चित्रे. –   मंदिरे,हा वेगळा घटक आहे

(४) ओव्या तवारिखा, कहाण्या, मिथके,-   तवारिखा.हा वेगळा घटक आहे

प्रश्न . म्हणजे काय?

(१) इतिहास

उत्तर : भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध व पद्धतशीरपणे दिलेली माहिती, म्हणजे इतिहास’ होय.

(२) इतिहासाची साधने.

उत्तर : ज्या विश्वसनीय पुराव्यांच्या आधारावर इतिहास लिहिला जातो, त्या पुराव्यांनाच ‘इतिहासाची साधने असे म्हणतात.

(३) ताम्रपट.

उत्तर : तांब्याच्या पत्र्यांवर कोरलेल्या लेखांना, आज्ञांना वा निवाड्यांना ‘ताम्रपट’ असे म्हणतात.

(४) शिलालेख.

उत्तर : दगडांवर किंवा भिंत्तींवर कोरलेल्या लेखांना ‘शिलालेख’ असे म्हणतात.

(५) बखर.

उत्तर : ‘बातमी या अर्थाच्या ‘खबर’ या शब्दावरून तयार झालेल्या इतिहासवजा लेखनप्रकाराला ‘बखर असे म्हणतात.

प्रश्न . पुढे दिलेल्या इतिहासाच्या साधनांचे भौतिक, लिखित व मौखिक साधने या प्रकारांत वर्गीकरण करा :

(शिलालेख, ग्रंथ, चैत्य, किल्ले, शस्त्रे, लोककथा, तवारिखा, मिथके, पोवाडे, नाणी, कपडे, बखरी, प्रवासवर्णने लोकगीते, ताम्रपट, विहिरी, श्लोक, ओव्या, दागिने, भांडी, चरित्रे, वादधे, वंशावळ्या, आज्ञापत्रे, मंदिरे, पत्रव्यवहार खलिते, म्हणी, न्यायनिवाडे.)

उत्तर :

भौतिक साधने  :  चैत्य, किल्ले, शस्ते, नाणी, कपडे, विहिरी, दागिने, भांडी वादये, मंदिरे.

लिखित साधने  :      पत्रव्यवहार, ग्रंथ, तवारिखा, आज्ञापत्रे, बखरी, प्रवासवर्णने, खलिते, चरित्रे, वंशावळया,  न्यायनिवाडे, शिलालेख, ताम्रपट.

मौखिक साधने     :    लोककथा, मिथके, लोकगीते,,  श्लोक, ओव्या, पोवाडे, म्हणी.

किल्ल्यांचे मुख्य प्रकार  : गिरिदुर्ग जलदुर्ग,वनदुर्ग भुईकोट

प्रवासवर्णन लिहिणारे परकीय प्रवासी :  अल्बेरुनी, इब्न  बतुता, निकोलस मनुची

इतिहासाचे महत्त्वाचे घटक :  व्यक्ती ,समाज,स्थळ ,काळ

उपलब्ध बखरी :  

महिकावतीची  बखर ,सभासद बखर,  खरड्याच्या  लढाईची बखर,,भाऊसाहेबांची बखर,  चिटणिसाची बखर,   एक्याण्णव कलमी बखर

प्रश्न    लिहिते व्हा : (एका वाक्यात उत्तरे लिहा.)

(१) स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो ?

उत्तर : स्मारकांमध्ये समाधी, कबर, वीरगळ (स्मृतिशिजा), थडगे, विजयस्तंभ, विजयकमानी इत्यादीचा समावेश होतो.

(२) ‘तवारिख म्हणजे काय?

उत्तर : ‘तवारिख’ म्हणजे काळाचा निर्देश करने किंवा घटनाक्रम सांगणे.

(३) इतिहासलेखनात लेखकाचे कोणते पैलू महत्त्वाचे असतात?

उत्तर : इतिहासलेखनात लेखकाची चिकित्सकवृती  निपक्षपातीपणा आणि तटस्थता है पैलू महत्वाचे असतात.

(४) पत्रव्यवहार व राज्यकर्त्याची  चरित्रे यांवरून आपल्याला कोणती माहिती मिळते ?

उत्तर : पत्रव्यवहार व राज्यकत्याची चरित्रे यांवरून आपल्याला त्यांची धोरणे, प्रशासकीय व्यवस्था तसेच त्यांचे राजकीय संबंध यांची माहिती मिळते.

(५) इमारतींमध्ये कोणत्या प्रकारच्या वास्तूंचा समावेश होतो ?

उत्तर : इमारतींमध्ये राजवाडे, मंत्रयांची निवासस्थाने, राणीवसा, सामान्य माणसांची घरे या वास्तूंचा समावेश होतो.

(६) कोणत्या मध्ययुगीन राजांच्या काळातील शिलालेख सापडले आहेत?

उत्तर : चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या मध्ययुगीन राजांच्या काळातील शिलालेख सापडले आहेत.

(७) बखरीतून आपल्याला कोणती माहिती मिळते ?

उत्तर : बखरीतून आपल्याला त्या काळातील सांस्कृतिक जीवन, भाषाव्यवहार, तत्कालीन राजकीय घडामोडी तसेच सामाजिक परिस्थिती यांची माहिती मिळते.

(८) कवी परमानंदांनी कोणते शिवचरित्र लिहिले ?

उत्तर : कवी परमानंदांनी संस्कृत भाषेत ‘श्रीशिवभारत’ हे शिवचरित्र लिहिले.

(९) मध्ययुगीन भारतावर लिखाण करणाच्या पाश्चात्त्य इतिहासकारांची नावे लिहा.

उत्तर : प्रेंट डफ, रॉबर्ट आर्म, एम. सी. स्प्रेंगल या पाश्चात्त्य इतिहासकारांनी मध्ययुगीन भारतावर लिखाण केले आहे.

प्रश्न  संकल्पना स्पष्ट करा :

(१) भौतिक साधने.

उत्तर : पूर्वीच्या काळातील माणसांनी वापरलेल्या वस्तूवरून] त्या काळच्या समाजातील परस्परसंबंधांची माहिती मिळते. प्राचीन वास्तू वा त्यांच्या अवशेषांच्या साहाय्याने त्या वेळच्या मानवी व्यवहारांची, त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती होते. अशा सर्व वस्तू आणि वास्तू वा त्यांचे अवशेष यांना ‘इतिहासाची भौतिक साधने’ असे म्हणतात.

 (२) लिखित साधने.

उत्तर : मानवाला लिहिण्याची कला अवगत झाल्यावर त्याने आपले अनुभव, सभोवताली घडणाच्या घटना लिहन ठेवायला सुरुवात केली. या लेखनावरून आपल्याला त्या काळातील लोकजीवन, आचारविचार, सणसमारंभ, खाण्याचे पदार्थ इत्यादीची माहिती मिळते. या सर्व साहित्याला ‘इतिहासाची लिखित साधने” असे म्हणतात.

(३) मौखिक साधने.

उत्तर : लोकपरंपरेत ओध्या, लोकगीते, लोककथा असे साहित्य पिढ्यान्पिढ्या पाठांतरादवारे चालत आलेते असते. असे साहित्य लिहून ठेवलेले नसते अशा साहित्यातून त्या काळच्या समजुती, विचार, श्रदुधा असे समाज- जीवनाचे विविध पैलू समजतात परंपरेने मौखिक स्वरूपात जतन केलेल्या या साहित्याला इतिहासाची मौखिक   साधने असे म्हणतात.

प्रश्न . ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का ? तुमचे मत सांगा.

उत्तर : ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करताना तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबी विचारातघ्याव्या लागतात. त्यासाठी ऐतिहासिक साधनांची गरज असते. परंतु ही साधने अस्सल असावी लागतात. केवळ जुना लिखित पुरावा म्हणून त्यावर विश्वास ठेवता येणार नाही. तो मजकूर कोणी, केव्हा व का लिहिला यांची छाननी करावीच लागते.सापडलेल्या वस्तूचीही चिकित्सकपणे पाहणी करावी लागते. या आधी विश्वासार्ह ठरलेल्या साधनांशी  ठरतील म्हणून ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते, 

प्रश्न  सांगा पाहू :

(१) नाणी इतिहास कसा सांगतात?

उत्तर : इतिहासाच्या भौतिक साधनांतील महत्त्वाचे साधन असलेली नाणी आपल्याला पुढील इतिहास सांगतात -(१) नाण्यांवरील चित्रांतुन त्या काळात कोण राज्यकर्ता होता, त्याचा काळ कोणता होता यांची माहिती होते. (२) त्या काळातील धार्मिक संकल्पना, लिपी भाषा यांचा बोध होतो. (३) नाण्यांच्या धातूवसरून त्या काळात |प्रचलित असणारे धातू, आर्थिक व्यवहार व आर्थिक परिस्थिती यांची माहिती होते. (४) नाण्यांवरील नक्षी, चित्रे यांवरून तत्कालीन कलेची प्रगती समजते. (५) नाण्यांच्या आकारावरून व घडणीवरून तत्कालीन धातुशास्त्र व नाणी पाडण्याची कला समजते.

(२) ऐतिहासिक वास्तूंच्या अभ्यासातून आपल्याला कोणती माहिती मिळते ?

उत्तर : ऐतिहासिक वास्तूंच्या अभ्यासातून आपल्याला – ( १) त्या काळातील वास्तुकलेची प्रगती समजते.  (२) कलेचा दर्जा समजतो. (३) त्या काळातील बांधकामाची शैली कशी होती है कळते. (४) त्या काळातील लोकांची आर्थिक स्थिती व राहणीमान कसे होते, हे माहीत होते.

प्रश्न  तुमचे मत लिहा : (कारणे लिहा.)

(१) शिलालेख हा इतिहासलेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो.

उत्तर : दगडांवर किंवा भिंतींवर कोरलेल्या लेखांना ‘शिलालेख’ असे म्हणतात. राजांनी दिलेल्या आज्ञा, देणग्या, धर्मगुरूंच्या धर्माज्ञा दगडांवर कोरलेल्या असतात. त्यातून त्या काळची लिपी, भाषा, समाजजीवन तारखांचा उल्लेख या बाबी समजतात. हे शिलालेख कोरलेले असल्याने त्यातील मजकुरात कोणालाही बदल करता येत नाही. त्यांतील घटना व तारखांच्या उल्लेखांमुळे शिलालेख हा इतिहासलेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो.

(२) मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात.

उत्तर : ओव्या, मिथके, लोककथा अशा मौखिक साहित्यात त्या त्या काळातील लोकांच्या समजुती विचार, श्रद्धा, लोकजीवन यांचे प्रतिबिंब पडलेले असते. हे साहित्य पाठांतराच्या रूपाने एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे दिले जाते. या साहित्याच्या अभ्यासामुळे पूर्वीच्या काळातील लोकजीवनाचे विविध पैलू समजतात.

(३) बखरी या इतिहासलेखनासाठी विश्वसनीय मानल्या जात नाहीत.

उत्तर : (१) इतिहासलेखनात साधनांची विश्वसनीयता आणि लेखकाचा नि.पक्षपातीपणा आवश्यक असतो. (२) बखरीत अनेकदा अतिशयोक्त आणि आलंकारिक वर्णन असते. शिवाय (३) अनेक बखरी घटना घडून गेल्यावर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असल्याने, त्या ऐकीव माहितीवर लिहिल्या गेल्या आहेत. म्हणून बखरी या इतिहासलेखनासाठी विश्वसनीय मानल्या जात नाहीत.

(४) इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते.

उत्तर : इतिहासलेखन एकदाच करून चालत नाही, कारण भूतकाळातील घटनांचे अखंडपणे संशोधन चालू असते. संशोधनाची नवी नवी साधने उपलब्ध होत असतात. त्यावरून नवी माहिती समोर येते. पूर्वीच्या माहितीचे संदर्भ बदलले जातात. त्यामुळे इतिहासाचे सतत पुनर्लेखन करावे लागते.

Leave a Comment